(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झूम अँपच्या माध्यमातून १ ऑगस्ट रोजी पाच सत्रात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे नामवंत अभ्यासक, संशोधक, तसेच त्यांच्या विचारांचा चळवळीतून पुढे वारसा चालवणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात जेष्ठ समाजसेविका प्रा. श्रीमती सुशीलाताई मोराळे यांनी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य व योगदान' या विषयावर प्रबोधन केले. अण्णाभाऊ यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेले योगदान व स्त्री जातीच्या कल्याणासाठी त्यांचे विचार व कार्य या विषयावर सुशीलाताईनी आपले विचार मांडले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन बार्टीचे समतादूत संजय गुजर यांनी केले. दुसर्या सत्रात अशोक पालके यांनी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास आणि साहित्य' विषयी प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कांबळे होते. कार्यक्रर्माचे सुत्रसंचलन समतादूत व्यंकटेश जोशी यांनी केले. तिसर्या सत्रात दत्ता कसबे यांनी 'जागतिक क्रांती करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तात्विक विचारांचा अंगिकार करण्याची गरज : एक चिंतन' या विषयावर प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद हातागळे प्रमुख पाहुणे खांडे पारगाव येथील सरपंच राजेंद्र आमटे हे होते. या कार्यकर्माचे नियोजन मधुसुदन मस्के यांनी केले होते. चौथ्या सत्रात प्रा. कु. अनुजा हिरवे यांनी 'अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य व योगदान' या विषयावर प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षय धुमाळ हे होते. समतादूत तुकाराम शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच सायंकाळी पाचव्या सत्रात सुभाष लोणके यांनी ' लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्र लढा' प्रबोधन केले या वेळी अध्यक्षस्थानी अजिंक्य चांदणे (डी. पी.आय. प्रदेश अध्यक्ष) होते तर दि. फ. लोंढे (समतादूत प्रकल्प अधिकारी परभणी) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. मा. ना. धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, मंत्री महाराष्ट्र राज्य), मा. ना. विश्वजित कदम (सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), पराग जैन - नैनुटीया (भाप्रसे) (प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग), कैलास कणसे (महासंचालक बार्टी, पुणे), यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती प्रज्ञा वाघमारे (मुख्य प्रकल्पसंचालिका समतादूत विभाग बार्टी,पुणे) यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी सर्वेश्वर कोठूळे समतादूत अमोल तांदळे, संजय गुजर, मधुसुदन मस्के, प्रदीप गुजर, रवींद्र नांदे, तुकाराम शेवाळे, ज्ञानोबा मात्रे , नानाभाऊ गव्हाणे, भीमा कानधरे, सय्यद अखेब, पुरुषोत्तम स्वामी, ज्ञानेश्वर ढगे, व्यंकटेश जोशी, श्रीमती वर्षा देशमुख, आदींसह नामवंत मान्यवर ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
|