<no title>

बँक कर्मचारी-ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करा.." -  धनंजय कुलकर्णी


बँक कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात...


पनवेल बातमीदार : बँकिंग सेवा अत्यावश्यक सेवेत समावेश झाल्याने लॉकडाऊन काळातही पूर्णक्षमतेने कर्मचाऱ्यांनी बँकांचे कामकाज सुरू ठेवले. लघु उद्योजक व्यापारी आणि शेती कर्जवाटपामुळे बँकांमध्ये गर्दी वाढू लागली. त्याचा परिणाम बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी कोरोना संसर्गाच्या जाळ्यात आले.  अशा परिस्थितीत उपाययोजना करण्याकडे महाबँक व्यवस्थापन लक्ष देत नसून सरकारच्या नियमांचे पालन न करता ग्राहकांच्या-कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. म्हणूनच प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याचा 50 लाखाचा विमा द्यावा तसेच बँकेत कर्मचार्यांची 50 टक्के उपस्थिती ठेवावी तरच काम करणे सोपे होईल अशी मागणी बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व संघटनांनी महाबँक व्यवस्थापनाकडे केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 6 जुलै रोजी सर्व संघटनांच्या वतीने व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले.


             युनायटेड फोरम ऑफ महाबँकच्या झेंड्याखाली रविवारी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यात 13 मागण्या व्यवस्थापनाकडे करण्यात आल्या यावर तातडीने निर्णय झाला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा  संघटनांनी दिला आहे.


मागण्या



  1. नियमितपणे सर्व शाखांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे

  2. शाखांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी सर्व शाखांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत.

  3. सोशल डिस्टंसिंग पाळण्याकरिता शाखेतील अंतर्गत जागेत बदल करण्यात यावेत

  4. जर एखाद्या शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर ती शाखा त्वरित बंद करण्यात यावी आणि महाराष्ट्र शासन,केंद्र शासन यांनी निर्देशित केलेल्या नियमांप्रमाणे त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे

  5. 55वर्षावरील कर्मचारी तसेच गर्भवती कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात यावी

  6. जिथे जिथे शक्य आहे तिथे पन्नास टक्के कर्मचारी आणि एक दिवसाआड बँकिंग या पद्धतीने बँक सुरू ठेवण्यात याव्यात


या प्रमुख मागण्या सह युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनच्या वतीने बँकेचे अध्यक्ष श्री ए एस राजीव यांच्या कडे बँकेच्या भारत भारतील  विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या भावना पोहचवाव्यात साठी 32 झोनल मॅनेजर  यांना निवेदन सादर करण्यात आले. बँकिंग सेवा अत्यावश्यक आहेच पण त्यासाठी बँक कर्मचारीही आवश्यक आहेच हि बाब समजून घेऊन व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे मत धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले. मुंबई येथे किशोर सावंत, सुधीर पाटील, संतोष जगताप, मुंबई उपनगर, ठाणे येथे नागेश नचान कर तर नवी मुंबई येथे गोपीचंद पाटेकर,  ज्योती भाटकर, निधी शर्मा यांनी निवेदने दिलीत. सदर निवेदने सादर केल्याची माहिती अरविंद मोरे यांनी दिली.


Attachments area









 

ReplyReply allForward